Monday, June 2, 2008

१६ ऑक्टोबर पासून राज्यभर आंदोलन -अनंत चोंदे
शिर्डी- गेल्या १८ वर्षा पासून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही,औरंगाबाद येथे १७ सप्टेबरला झालेल्या मंत्रिमंडलाच्या बैठकित दिलेली मुदत येत्या १६ तारखेला संपत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात निर्णय न घेतल्यास् राज्यभरात जोरदार आंदोलन छेडले जाइल,असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांनी दिला आहे,दरम्यान मराठा समन्वय समिति तर्फे २ नोव्हेबर पासून आंदोलन सुरु केले जाणार आहे. पहा -http://www.pudhari.com/AhemadNagarGraminDetailNews.aspx?news_id=82464
maratha samanway samiti will take out a huge morcha on maharashtra state cabinet meeting !!!!
Aurangabad:-on the occasion of marathwada muktisangram din (17th sept 2008) maharashtra cabinet has called a two day meeting at aurangabad.
samiti will take out a huge morcha on cabinet meeting on 17th september 2008.this samiti consists of near about 12 to 13 sanghatana and various political parties.










मराठा-ओबीसी आरक्षण प्रश्न पेटला ......मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघटनांची आता समन्वय समिती

औरंगाबाद, ता. २३ - मराठा समाजाचा इतर मागासवर्गीयांत समावेश करावा, या मागणीसाठी समाजातील संघटनांनी एकत्र येऊन मराठा समन्वय समितीची स्थापना केली असून शासनाने आरक्षण न दिल्यास राजस्थानातील गुर्जर समाजाच्या आंदोलनाप्रमाणे तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा समन्वय समितीच्या सदस्यांनी आज (ता. २३) येथे पत्रकार परिषदेत दिला.
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अनेक संघटना लढा देत होत्या. मात्र, संघटनांमध्ये आरक्षणाचे स्वरूप व इतर काही मुद्यांवरून मतभेद होते, त्यामुळे लढ्याला यश येत नव्हते. १९ ऑगस्ट रोजी पुणे येथे झालेल्या बैठकीत आरक्षणावर चर्चा होऊन समाजाचा इतर मागासवर्गीयांत समावेश करण्याची मागणी रेटून धरण्याचा निर्णय घेण्यात आला. मागणीसाठी मराठा समन्वय समितीच्या झेंड्याखाली एकत्रित लढण्याचे ठरले. बैठकीस मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, शिवसंग्राम संघटना, अखिल भारतीय छावा, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, बुलंद छावा, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्रीय मराठा महासंघासह विविघ संघटनांचे १०० मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचे ठरले असून, ही जबाबदारी समितीने विनायक मेटे यांच्यावर सोपविली आहे. सर्वप्रथम समिती लोकशाही मार्गाचा अवलंब करीत मंगळवारी (ता. दोन) क्रांती चौक येथे रास्ता रोको आंदोलन करणार आहे. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढण्यात येणार आहे. आरक्षणाचा निर्णय निवडणुकीपूर्वी व्हावा, अशी समितीची भूमिका आहे. निर्णय न झाल्यास समितीचे आंदोलन समाजाच्या हाती जाईल व त्यानंतर राज्यामध्ये राजस्थानाच्या गुर्जर आंदोलनाची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता आहे. राज्य मागासवर्गाने पाठविलेला अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करावा, ऍट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी व अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारकाचे जलपूजन तातडीने करून त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या पत्रकार परिषदेला प्रा. देवीदास वडजे, किशोर चव्हाण, मिलिंद पाटील, चंद्रकांत भराट, प्रदीप सोळुंके, मनोज पाटील, विष्णू वाकडे, सोमनाथ पवार, सुरेश वाकडे, संजय तायडे आदींची उपस्थिती होती.




यापुढे गनिमी काव्याने लढा - प्रवीण गायकवाड
सातारा, ता. ६ - संपूर्ण राज्यात मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून दाखले मिळत आहेत. केवळ पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात दाखले दिले जात नाहीत. ही दुर्दैवाची बाब असून, शासनाचे याची दखल न घेतल्यास संभाजी ब्रिगेड गनिमी काव्याने शासनाविरोधात लढा देईल, असा इशारा ब्रिगेडचे कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलनाची दिशा व स्वरूप ठरविण्यासाठी येथील अजिंक्‍य सांस्कृतिक संकुलात आयोजिलेल्या संभाजी ब्रिगेडच्या मराठा आरक्षण मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ नवले, महासचिव अतुल पाटील, सी. आर. सावंत, जिल्हाध्यक्ष राजेंद्र जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. गायकवाड म्हणाले, ""ब्रिगेडच्या या लढ्यात आता लोकही सहभागी होऊ लागल्याने हा लढा प्रखरपणे लढला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले आरक्षण आम्ही मागत आहोत. यामध्ये कोणत्याही जातीवर अन्याय करण्याचा आमचा प्रयत्न नाही. इतर राज्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षणाची टक्केवारी वाढवून आरक्षण द्यावे, अशी आमची मागणी आहे. कोकणात उर्वरित राज्यात कुणबी मराठा दाखला मिळत आहे. मात्र, पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात दिला जात नाही. याची शासनाने दखल न घेतल्यास गनिमी काव्याने शासनाशी लढा दिला जाईल.'' या वेळी सोमनाथ नवले, अतुल पाटील आदींची भाषणे झाली. दरम्यान, संभाजी ब्रिगेडच्या मराठा आरक्षण संघर्ष अभियान रॅलीचे आज साताऱ्यात आगमन झाले. रॅलीचे स्वागत जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केले. ही रॅली सांगली, कोल्हापूरला जाऊन १५ ऑगस्टला बीड येथे तिचा समारोप होणार आहे. या वेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाजीराव देशमुख, मार्गदर्शक युवराज पवार, पी. डी. घोरपडे, जितेंद्र चव्हाण, नानासाहेब यादव, जयवंत मोरे, उपाध्यक्ष रवींद्र ढाणे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

सोलापूर परिसरात तीन बसवर दगडफेक
सोलापूर, ता. ६ - "जय भवानी, जय शिवाजी', "मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे' अशा घोषणा देत काही अनोळखी व्यक्तींनी तीन बसवर दगडफेक केली. या घटना बुधवारी मध्यरात्रीपासून दुपारी चारपर्यंत टप्प्याटप्प्याने घडल्या. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावरील कोंडीजवळ बस क्रमांक (एमएच १२ सीएच ८९३०) तर तुळजापूर रस्त्यावरील हगलूरजवळ दुपारी एकच्या सुमारास (एमएच १२ सीएच ७३०९) आणि उत्तर सोलापूर तालुक्‍यातील अकोलेकाटीजवळ सायंकाळी साडेचारच्या (एमएच १३ एआर ९७७३) या तीन बसवर दगडफेक झाली.
अनंत चोंदे यांच्या अटकेचा निषेध
सोलापूर, ता. ६ - संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांना पुण्यात काल अटक करण्यात आली आहे. त्याचा निषेध करत असून त्यांना त्वरित सोडण्यात यावे, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.मराठा समाजाला कुणबी म्हणून इतर मागासवर्गीय समाजात समावेश करावा आणि आरक्षण द्यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. त्यानिमित्ताने चोंदे यांची रथयात्रा पुण्यात आली असता त्यांना अटक करण्यात आली होती. आरक्षणाची मागणी न्याय्य असून त्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे. गेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाच्या मागणीचा विचार करून सहा महिन्यांत निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले होते. सहा महिन्यांनंतर मुख्यमंत्र्यांना भेटले असता त्यांनी वीस दिवसात आदेश काढण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन पाळले नाही. सनदशीर मार्गाला सरकार दाद देत नसल्याने आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले. त्यामुळे राज्यात आंदोलन होत आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे व त्वरित तोडगा काढावा, असे जिल्हाध्यक्षा नंदा शिंदे यांनी म्हटले आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष चोंदे यांना न्यायालयीन कोठडी
उस्मानाबाद, ता. ६ - मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत संभाजी ब्रिगेडचे आंदोलन सुरूच राहील. मला पोलिसांनी अटक केली असली तरी आमचे कार्यकर्ते हे आंदोलन अधिक तीव्रतेने चालूच ठेवतील, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांनी येथे बुधवारी (ता. सहा) पत्रकारांशी बोलताना सांगितले. तालुक्‍यातील हिंगळजवाडी शिवारात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एसटी बस पेटवून दिल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने मंगळवारी (ता. पाच) रात्री दहा वाजता पुणे येथील बाजीराव चौकात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष श्री. चोंदे यांना अटक करून बुधवारी (ता. सहा) सायंकाळी पाच वाजता उस्मानाबादेतील न्यायालयासमोर हजर करण्यासाठी आणले असता श्री. चोंदे पत्रकारांशी बोलत होते. श्री. चोंदे म्हणाले, ""मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे, परंतु यासंबंधी निर्णय जाहीर करण्यास सरकार वेळकाढूपणा करीत आहे. आरक्षणाची मर्यादा ५० टक्‍क्‍यांवरून ८५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढवावी व मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी एक ऑगस्टपासून आम्ही आरक्षण जनजागृती अभियान यात्रा सुरू केली आहे. कुणबी मराठ्यांचा विदर्भात ओबीसीमध्ये समावेश आहे. राज्याच्या अन्य भागांतील मराठा समाजाचा ओबीसी समावेश करण्यासाठी सरकारच्या जुन्या जीआर (शासन निर्णय) निर्णयात मराठा कुणबी असा बदल करण्यासाठी सरकार वेळकाढूपणा करीत आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन सुरू केले आहे. मराठा समाज हा जगाचा पोशिंदा आहे. त्यांच्यावरच सरकार अन्याय करीत आहे. इतर पक्ष संघटनांनीही या आंदोलनात सक्रिय सहभागी होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत तीव्र आंदोलन चालू ठेवले पाहिजे, असे आवाहन श्री. चोंदे यांनी केले. श्री. चोंदे यांना उस्मानाबाद न्यायालयात आणणार असल्याचे समजताच मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजीराव गोरे, सेवा संघाचे माजी अध्यक्ष डी. आर. कदम, विक्रमसिंह जालन, जिजाऊ ब्रिगेडच्या सौ. जयश्री चव्हाण, तुळजापूर तालुकाध्यक्षा सौ. शिंदे, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे श्री. लोखंडे, ऍड. इंगळे आदींसह कार्यकर्त्यांनी श्री. चोंदे यांची भेट घेतली.
आरक्षणाच्या संदर्भात आयोगाचा अभ्यास सुरू - मुख्यमंत्री
लातूर, ता. ६ - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आयोग अभ्यास करीत आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी संयमाने वागण्याची गरज आहे. कोणी कायदा हातात घेऊन आंदोलन करणार असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत. यावर श्री. देशमुख म्हणाले, ""मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही हा विषय राज्य सरकारला घेता येत नाही. त्यासाठी आयोग आहे. हा आयोग सध्या अभ्यास करीत आहे. आयोगाच्या शिफारसी आल्यानंतरच राज्य मंत्रिमंडळ निर्णय घेत असते. आयोगाला लवकर अभ्यास करून त्यासंदर्भातील अहवाल पाठवा, असे म्हणता येत नाही. सर्व कागदपत्रे, पुरावे पाहूनच आयोग शिफारस करीत असते. सध्या आयोग अभ्यास करीत आहे.'' आंदोलकांनी आक्रमक पवित्रा न घेण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

समाजाला आरक्षणसाठी आंदोलन - हिंगोलीत बस फोडली
हिंगोली - वसमत-नांदेड मार्गावर निळा पाटीजवळ आठ ते दहा जणांनी लातूर-वसमत या बसच्या (एमएच२०/डी ५६५०) काचा फोडल्या. ही बस निळा पाटीजवळ आली असताना आठ ते दहा जणांनी बससमोर येवून बस थांबवली. त्यानंतर प्रवाशांना खाली उतरवून बसच्या काचा फोडल्या. यामध्ये बसचे आठ हजार रुपयांचे नुकसान झाले.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची शासकीय जीप, बसवर दगडफेक
बीड, ता. ६ - मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येत असून, मंगळवारी प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांना पुणे येथे झालेल्या अटकेच्या निषेधार्थ बुधवारी (ता. सहा) कार्यकर्त्यांनी येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीच्या आवारातील शासकीय वाहनांवर तसेच पाटोदा व आष्टी तालुक्‍यांत बसवर दगडफेक केली.मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी एक ऑगस्टपासून संभाजी ब्रिगेडतर्फे मराठा आरक्षण रथयात्रा सुरू झाली असून, या रथयात्रेचा राज्यभर दौरा सुरू आहे. या दौऱ्यादरम्यान काही ठिकाणी त्यास हिंसक वळण लागले. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांना मंगळवारी (ता. पाच) पुणे येथे अटक केल्याच्या निषेधार्थ बुधवारी (ता. सहा) ठिकठिकाणी तहसीलसमोर निदर्शने करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून येथील तहसीलसमोर काही कार्यकर्ते आले. त्यांनी प्रशासकीय इमारतीच्या आवारातील शासकीय जीपवर दगडफेक केली. त्यात पुरवठा विभागाच्या जीपचे (एमएच-२३ बी-८३६) नुकसान झाले. या प्रकरणी सायंकाळपर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नव्हता. दरम्यान, या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शरद चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जनजागृती सुरू असून, त्याअंतर्गत आंदोलन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले
आष्टी, पाटोद्यात बसवर दगडफेक
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आष्टी तालुक्‍यात कडा साखर कारखान्यासमोर भिवंडी-कल्याण-तुळजापूर (एमएच- १२ डीएच-७८३६) या बसवर दगडफेक केली. चुंबळी फाट्यावरही (ता. पाटोदा) येथे एका बसवर दगडफेक केली.
"मराठ्यांना आरक्षित करा, अन्यथा सुरक्षित राहणार नाही' -
संभाजी ब्रिगेडपुणे, ता. ५ - मराठा समाजाला आरक्षित-सुरक्षित केले नाही, तर राज्यकर्त्यांनाही सुरक्षित राहू देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांनी आज दिला.मराठा समाजास आरक्षण मिळावे, या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मराठा आरक्षण रॅलीचे आज पुण्यात स्वागत करण्यात आले. त्या वेळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड, श्रीमंत कोकाटे, शांताराम कुंजीर, सारिका भोसले, विजयकुमार ठुबे, संतोष शिंदे, तुषार काकडे, अर्चना जगताप, वासंती नलावडे, संतोष नानवटे, प्रभाकर दुर्गे आदी या वेळी उपस्थित होते. चोंदे म्हणाले, ""आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या निकषात बसूनही मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, ही खेदाची बाब आहे. सध्याचे सरकार हे प्रस्थापितांचे सरकार असून, तातडीने आरक्षण जाहीर करावे, अन्यथा संघर्ष तीव्र करण्यात येईल.'' दरम्यान, आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजानेही जुनी मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे मत प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले. समाजात या बाबत अज्ञान आहे आणि दुसरीकडे राजकीय इच्छाशक्ती नाही. त्यामुळे आरक्षण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची गरज आहे. साठ टक्के समाज हा दारिद्य्ररेषेखाली असेल, तर तो फक्त शेतीवर जगू शकत नाही; त्याला उभा करण्यासाठी आरक्षणासारख्या सवलतींची गरज आहे, असेही ते म्हणाले. सरकारने सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि इतर मागासवर्गाच्या आरक्षणात वाढ करावी, अशी मागणी कोकाटे यांनी केली.

ता. ५ - येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उभ्या करण्यात आलेल्या शासनाच्या दोन जीप मंगळवारी (ता.पाच) रात्री जाळण्यात आल्या. यात एक जीप पूर्ण जळून खाक झाली आहे. घटनास्थळी मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे संभाजी ब्रिगेडचे पत्रके पोलिसांना मिळाली आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी ः येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सर्वच शासकीय विभागाची वाहने रात्री लावली जातात. या कार्यालयाच्या मागच्या बाजूस मंगळवारी रात्री कृषी विभागाची एमएच २४, ए ७५१२ ही जीप व मत्स्य विभागाची एमएच २४ एन ७८४ ही जीप लावण्यात आली होती. मंगळवारी रात्री या दोन्ही जीप अज्ञात व्यक्तींनी जाळल्या. यात कृषी विभागाची जीप पूर्णपणे जळून खाक झाली आहे. तर मत्स्य विभागाच्या जीपचे समोरच्या काचा फोडून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
संभाजी ब्रिगेडचे आंदोलन तापले...
औरंगाबाद, ता. ५ - मराठा समाजाचा ओ.बी.सी.प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन सुरू असून आंदोलन दिवसेंदिवस तापत आहे. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद विभागातील चार बसची जाळपोळ, तोडफोड केल्यामुळे तब्बल २० लाख रुपयांवर नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मंगळवारी (ता. पाच) सायंकाळी साडेचारच्या सुमारास औरंगाबाद-कोपरगाव या बसवर संतप्त जमावाने दगडफेक केल्याने बसमधील चार प्रवासी जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. बसमधील प्रवाशांना खाली उतरवून जांभाळा येथे संतप्त जमावाने बसच्या काचा फोडून बस पेटवून दिली. यामध्ये बसमधील सीट व टायरसह अर्धी बस जळाली. तसेच औरंगाबाद विभागातील हिंगोली-पुणे ही गाडी पांढरी पूल येथे संतप्त कार्यकर्त्यांनी पेटवून दिल्याने बसचे ३ लाखांचे नुकसान झाले. परभणी-पुणे ही गाडी फोडून टाकली. या गाडीचे १ लाखाचे नुकसान झाले, तर तीन महिन्यांपूर्वीच विभागाला मिळालेली नवी कोरी एशियाड गाडी संतप्त कार्यकर्त्यांनी संपूर्णत: जाळल्याने भस्मसात झालेल्या बसचे १५ लाखांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, सदर घटना नगर विभागाच्या अंतर्गत घडल्याने नगरचे विभाग नियंत्रक पोलिस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आरक्षण मिळेपर्यंत लढा चालूच ठेवणार - पुरुषोत्तम खेडेकर
ता. ४ - मराठा समाजाचा "ओबीसी'मध्ये समावेश होईपर्यंत लढा चालूच राहणार असल्याचे मराठा सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी आज येथे सांगितले. "ओबीसी' आरक्षणाबाबत त्यांनी येथे बैठक घेतली. संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, शिरीष जाधव, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक अमोल शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिजाऊ ब्रिगेडच्या नंदा शिंदे, महेश चव्हाण आदी उपस्थित होते. श्री. खेडेकर म्हणाले, ""आरक्षणाचे आंदोलन मराठा सेवा संघ किंवा संभाजी ब्रिगेडपुरते मर्यादित राहिलेले नसून ती आता लोकचळवळ झाली आहे. त्यामुळे त्यामध्ये महिला, विद्यार्थ्यांसह समाजाच्या सर्व थरातील लोक सहभागी होत आहेत. संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी सर्व प्रकारची आंदोलने करू. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच घटकांची जबाबदारी संघ घेईल. त्यांनी कोणत्याही प्रकारे आंदोलन केले, तरी संघ त्यांच्या पाठीशी राहील.'' ते पुढे म्हणाले, ""मराठा लोकप्रतिनिधींनी राज्यकर्ते म्हणून या प्रश्‍नाकडे पाहावे. लोकांची मागणी म्हणून त्याला प्रतिसाद द्यावा. त्यांनी तसा तो दिला नाही, तर समाजातील लोक त्यांच्याबाबतीत विचार करतील. सर्वच पातळ्यांवर आंदोलन सुरू राहणार असून कोणताही भेदभाव न करता संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील.''
तहसीलदारांची जीप फोडली
शिर्डी मराठी समाजाला इतर मागासवर्गाचा दर्जा (ओबीसी) द्यावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने सुरू केलेले आंदोलन चांगलेच भडकले असून, नगर जिल्ह्यात रोजच कुठे-न-कुठे तोडफोड सुरू आहे. सोमवारी सकाळीही संगमनेर तहसीलदारांची जीप फोडून ती जाळण्याचा प्रयत्न झाला. पोलिस पोहोचण्याआधीच आंदोलक पसार झाले. मराठा समाजाच्या ओबीसी दर्जाबाबत सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास संपूर्ण राज्यात आंदोलन पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला होता. सोमवारच्या घटनेत पोलिसांनी अज्ञात कार्यर्कत्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोनच दिवसांपूवीर् प्रवरानगरात पालकमंत्री वळसे-पाटील यांच्या सभेत एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता.

'संभाजी ब्रिगेड'ची पंढरपुरात दगडफेक
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या 'बाइक'स्वार कार्यर्कत्यांनी रविवारी पंढरपुरात ३ एसटी गाड्यांची तोडफोड केली. यामध्ये आठ जण जखमी झाले. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेडने रविवारी अचानक दगड हाती घेत एसटी गाड्यांना लक्ष्य केले. पंढरपूर-नगर रस्त्यावर कार्यर्कत्यांनी नगरकडे जाणाऱ्या व पटवर्धन कुरोलीकडे जाणाऱ्या दोन एसटी बसच्या काचा फोडल्या. प्रवाशांनी खचून भरलेल्या या गाड्यांवर हल्ला चढवल्याने एकच घबराट उडाली. त्याचवेळी पंढरपूर-सोलापूर रस्त्यावरही या कार्यर्कत्यांनी असाच गोंधळ घातला. तेथेही एक एसटी बस फोडली. दगडफेकींच्या या घटनांमुळे एसटी प्रशासनाने बससेवा स्थगित केली.



महाराष्ट्रभर "रास्ता रोको" यशस्वी....मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आदि भागात जोरदार निदर्शने ....मोर्चे...रास्ता रोको....दोन दिवसात निर्णय न झाल्यास पुढील आंदोलन शिवनीतिने करण्याचा संभाजी ब्रिगेड्चा इशारा.....
एक मराठा....लाख मराठा..... ,जय जिजाऊ ...जय शिवराय... ,भांडारकर तो झांकी है...अभी तो बहोत कुछ बाकी है... ,मराठ्यांना आरक्षण मिलालेच पाहिजे... ,तुमचं आमचं नातं काय...जय जिजाऊ जय शिवराय.... अश्या घोषनानी अवघा परिसर दुमदुमून गेला होता...
मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही..असा नाराजीचा सुर मराठा समाजातून उमटत आहे... आरक्षण प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे...

वाचा -







आरक्षणासाठी मराठे पेटले....


मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रभर "रास्ता रोको" दि १०-जुलै-२००८ स.१०:०० वाजता.












संभाजी ब्रिगेडचे २२ जूननंतर राज्यभर आक्रमक आंदोलन-

अनंत चोंदे


ता. २९ - मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधीचा निर्णय येत्या २० दिवसांत न घेतल्यास २२ जूननंतर राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांनी दिली.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या समाजाचा "ओबीसी'मध्ये समावेश करावा, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याची माहिती देण्यासाठी गुरुवारी (ता. २९) चोंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक चक्रधर शेळके, जिल्हाध्यक्ष दत्ता कवडे, तालुकाध्यक्ष रोहित पडवळ, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र कदम, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डी. आर. कदम, भुतेकर, विक्रमसिंह जालन, संपत भिसे उपस्थित होते. श्री. चोंदे म्हणाले, की मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या समाजाचा "ओबीसी'मध्ये समावेश करावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नोव्हेंबर २००७ मध्ये नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या वेळी बेमुदत उपोषण सुरू केले होते. दोन दिवस सरकारने या उपोषणाची दखल घेतली नव्हती. त्यामुळे संघटनेने तिसऱ्या दिवसांपासून राज्यभरात तीव्र आंदोलन केले होते. याचा परिणाम म्हणून २४ नोव्हेंबर २००७ रोजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, परिवहन राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सहा महिन्यांत निर्णय घेण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन देण्यात आले होते.
दरम्यान, या प्रश्‍नावर सरकारशी पत्रव्यवहार सुरू ठेवण्यात आला होता. सरकारने दिलेल्या आश्‍वासनाची मुदत २४ मे रोजी झाली आहे. या सहा महिन्यांत सरकारने या मागणी संदर्भात कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्यामुळे दोन जूनपासून आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यादृष्टीने आंदोलनाची तयारीही करण्यात आली होती, असे सांगून चोंदे म्हणाले त्यानंतर शिक्षणमंत्री पुरके यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पत्र देऊन संघटनेच्या या इशाऱ्याची दखल घेऊन ३० मेपूर्वी निर्णय घेण्याची विनंती केली होती. आमदार सौ. रेखा खेडेकर यांनीही पुरके यांना २७ मे रोजी पत्र देऊन सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. बुधवारी (ता. २८) मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला मला आणि चक्रधर शेळके यांना बोलाविण्यात आले होते. बापट आयोगाचा औरंगाबाद, लातूर जिल्ह्याचा अहवाल यायचा असल्याने यासाठी किमान १५ ते २० दिवस लागतील. त्यानंतर लगेच बैठक घेण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या या बैठकीत घेण्यात आला. सरकारने २० दिवसांची मुदत मागून घेतल्यामुळे दोन जून रोजीचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. या २० दिवसांच्या आत सरकारने कोणताही ठोस निर्णय घेतला नाही तर संभाजी ब्रिगेड राज्यभर तीव्र, आक्रमक आंदोलन करणार आहे. त्यासाठी समाजबांधवांनी सतर्क राहावे, असे आवाहन श्री. चोंदे यांनी केले आहे. मराठा समाजाला आरक्षण देणे, या समाजाचा "ओबीसी'मध्ये समावेश करण्याचा शासन निर्णय जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्यात येणार आहे, असे श्री. चोंदे यांनी सांगितले.


Maratha Community Demanding O.B.C. Reservation.

मराठा व कुणबी ह्या दोन भिन्न जाती नसून एकच आहे- संभाजी ब्रिगेड
मराठा समाज कुणबी असल्याचे पुरावेमराठा समाज कुणबी असल्याचे असंख्य पुरावे देता येतील. वास्तविक पाहता मराठा व कुणबी या दोन्ही भिन्न जाती नसून एकच आहे. (सन १८८१ पासून १९३१ पर्यंतच्या ५० वर्षाच्या गॅझेट मध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख केला जातो)
पुरावा १ :- १९८१ च्या जनगणनेत मराठ्यांचा कुणब्यांमध्ये समावेश केला होता.
संदर्भ :- Bombay Gazetter Satara, Vol. XIX, Page 75, Marathas are found all over the district. The 1981 Census includes them under "Kunbi" from whom they do not form a separate caste.

पुरावा २ :- मराठा व कुणबी यांचा समावेश कुणबी ह्या शब्दात होतो. या दोघांमध्ये भेद दर्शविणे कठीण आहे. या दोघांमध्ये परस्पर रोटी व बेटी व्यवहार चालतो. त्यांचे रूप, रंग, धर्म कर्म, रीती रिवाज यात काही फरक नाही.
संदर्भ :- Bombay Gazeteer, Poona Vol. XVIII, Part-I. The term kunbi includes two main classes "Kunbis" and "Marathe" between whom it is difficult to draw a line. Maratha and Kunbi eat together, intermarry and do not differ in appearance, religion and caste.

पुरावा ३ :- "मराठा" व "कुणबी" यांच्यातील लग्न वैध असल्याचा व मराठा व कुणबी एकच असल्याबद्दल कोर्टाचा निकाल.
संदर्भ :- Civil Suit No. 2 of 1920 decided on 25-10-1921 to judgement Maratha caste is genus while Kunbi caste is in species and that marriage between Maratha and Kunbi are Kunbi and perfectly valid in law.

पुरावा ४ :- Gazetter of India M.S. Parbhani Dist. Page 103 : No Permanent division between Kunbi and Maratha,
वर उल्लेख केलेल्या पुराव्यावरून हे सिद्ध होते की, 'मराठा' व 'कुणबी' ह्या दोन भिन्न जाती नसून एकच आहे. शेती करणारे मराठा म्हणजे कुणबी.संदर्भ :- मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिलेला निर्णय आहे. व अमरावती कोर्टाच्या निर्णयानुसार शेती करणारा हा कुणबी हा स्पष्ट होता.

शेती करणारा मराठा म्हणजेच कुणबी हे सिद्ध करणारे पुरावे
पुरावा १ :- Gazetter of India, M.S. Aurangabad District Page 293. The Kunbis from the main body of agricultural population the members of which by heridatary occupation are farmers and tillers of soil.

पुरावा २ :- Gazetter of India, M.S. Wardha Dist. Page 148 - "Kunbi has come to be the accepted type of all Maratha cultivator"
सर्व मराठा शेतकरी कुणबी आहेत.

पुरावा ३ :- Gazetter of India, M.S. Wardha Dist. Page 160 - "Kunbi are regular agricultural caste of district"
कुणबी ही नियमित शेती करणारी जात आहे.

पुरावा ४ :- Gazetter of India, M.S. Nagpur Dist. Page - The Kunbi is traditional. The term Kunbi has become the generic name for professional cultivator.
कुणबी हे परंपरागत व्यवसायाने शेतकरी आहेत.

सर्व संदर्भाद्वारे हे सिद्ध होते की, शेती करणारा मराठा म्हणजेच "कुणबी" म्हणून महाराष्ट्रातील सर्व शेती करणा-या मराठ्यांना "कुणबी" या जातीने ओळखले जावे.
श्री. एफ.ई. इथावेन यांनी त्यांच्या मुंबईच्या जाती व जमाती खंड-३ या पुस्तकात 'कुणबी' या नावाखाली येणा-या जातींचे विश्लेषण केले आहे ते असे.


वर्ग-१ :- मराठा कुणबी - शेती करणारे मराठा यांचा समावेश या वर्गात होतो. यांनाच कुळवाडी असे म्हणतात.

वर्ग-२ :- इतर मराठा - यात गवंडी, कुंभार, सुतार, परीट यांचा समावेश होतो.

पुरावा :- Imperial Gazetter of India (New edition) Volume XVI. "Maharashtra is country of Maratha who form 55 percent of its population. The term Maratha is not reserved for the old fighting stock a hardy and various class once the terror of India now merged very largly in the cultivating class known as kunbi".

कुणब्यांनाच मराठा म्हटलेले जाते असा पुरावा
पुरावा :- तत्कालीन हैद्राबाद संस्थानाने प्रसिद्ध केलेले गॅझेटीअर
The term Maratha is now applied principally to the are Kunbis. It should be unframed to the military family of the countries. The Kunbis from main body of the cultivator population.


पुरावा :- जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती समाज कल्याण, म.रा. पुणे यांनी त्यांच्या क्र.जा.प्र.क्र./अपील क्र. ४/९६/कांताबाई इंगोले ९६-९७/का-२०६३ पुणे, दिनांक १६-१२-९६ व क्र.जा.प्र.प./ अपील क्र. १०/९६/ बा.द.पाटील/९६-९७/का-२०४२, पुणे दि. ०९-१२-९६. या दोन्ही निर्णयात शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी असा निर्णय दिला आहे. हा निर्णय सर्वांसाठी लागू करावा.

म्हणून "कुणबी व मराठा" एकच असल्याबद्दलचे वर उल्लेख केलेले इतर आणखी पुरावे सापडतील. तसेच शेती करणारा 'मराठा' म्हणजेच 'कुणबी' या जातीचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी मराठा सेवा संघ प्रयत्नरत आहे. ह्याच आधारावर महाराष्ट्रात मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधून शासनाच्या ओ.बी.सी. मध्ये लागू असलेल्या सर्व शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादी सवलती त्वरीत द्याव्यात. अशी मागणŀ संभाजी ब्रिगेडचे राज्याध्यक्ष अनंत चोंदे, कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड, सचिव मनोज आखरे आणि हजारो कार्यकर्त्यांनी नोव्हेंबर २००७ च्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचे वेळी केली. ज्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिले होते.पण ह्या आश्वासनावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही, त्यामुलेमराठा समाजातील अनेक संघटनामध्ये असंतोष पसरला आहे.संभाजी ब्रिगेड ने २ जूनला "महाराष्ट्रबंद" चे आवाहन केले होते.त्यावर मुख्यमंत्र्यानी २० दिवसच्या आत निर्णय देण्याचे काबुल केले होते.२२ जून पर्यंत कार्य वही अपेक्षित आहे,पण त्या नंतर अधिक आक्रमक आंदोलन करण्यात येणार असल्याचे संभाजी ब्रिगेड , मराठा महासंघ , मराठा सेवा संघ , छावा मराठा संघटन आदि संघटनानी म्हटले आहे.तसेच हे आंदोलन गुज्जर आंदोलनापेक्षा तीव्र करण्याचा सनसणित इशारा ह्या संघटनानी दिला आहे
तसेच ह्या आंदोलनाला इतर २५ संघटनानी पाठिंबा दिला आहे व एकून आरक्षणाची मर्यादा वाढविन्याचीही मागणीही केली आहे.मर्यादा वाढविन्याच्या मागणीचे जोरदार स्वागत इतर समाजातून होत आहे.
SAMBHAJI BRIGADE ,MARATHA MAHASANGH,CHHAWA AND OTHER MARATHA UNIONS DEMANDING RESERVATION IN OBC QUOTA,

MARATHAS ARE KUNBIS.
KUNBIS ARE MARATHAS.

मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही - रामदास आठवले
ता. २७ - मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्यांना आरक्षण देण्यास रिपब्लिकन पक्षाचा विरोध नाही.मात्र, मागासवर्गीय समाजाला घटनेने दिलेल्या आरक्षणाला धक्का लावू नये, असे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, ""सन १९८३- ८४ मध्ये मंडल आयोगापुढे दलित पॅंथरच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या कुणबी समाजाला आरक्षण द्यावे, ही मागणी आम्ही केली होती. घटनात्मकदृष्ट्या मागासवर्गीय समाजाला १५ टक्के व आदिवासींना साडेसात टक्के (७.५) आरक्षण आहे. त्याला धक्का लागू नये, एवढी काळजी आम्ही घेत आहे.

MARATHA OBC RESERVATION LINKS-

http://www.freewebs.com/akshalok/itihaas.htm

http://www.shivdharma.com/campaign_reservation.asp

http://shivadharmee.weebly.com/shivadharma-literature.html (pdf files are there)


मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रभर "रास्ता रोको" दि १०-जुलै-२००८ स.१०:०० वाजता.