मराठा सेवा संघ (maratha seva sangh) ही नोंदणीकृत सेवाभावी संस्था असून तिची नोंदणी १९९० मधे झालेली आहे. मराठा समाजास सरसकट ओबीसी घोषित करावे, या साठी मुख्यमंत्री मा. मनोहर जोशी(manohar joshi) यांच्या समवेत दिर्घ बैठका झाल्या आहेत मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या " वर्षा " या निवास स्थानी दिनांक ०६-०८-१९९६ रोजी झालेल्या पहिल्या प्रदीर्घ बैठकीस मराठा समाजाचे त्यावेलेचे अनेक मराठा कुणबी आमदार,खासदार, मंत्री उपस्थित होते, शिवाय जवलपास सर्वच खात्याच्या प्रधान सचिवानाही बोलावले होते, ही बैठक सहा तास चालली होती.
त्या नंतर 'सह्याद्री" ह्या मुंबईच्या अतिथिगृहात दि.४-९-१९९८ रोजी मुख्यमंत्री मनोहर जोशी ह्यानी आढावा बैठक घेतली.या बैठकीस मराठा समाजाच्या विविध संस्थांच्या पदाधिकारयाना आमंत्रित करण्यात आले होते.त्यासाठी मराठा कुणबी आमदारांची बैठक दि.२०-०७-२००५ रोजी मुंबई येथे तर,दि.१४-१२-२००५ रोजी नागपुर येथे बोलावण्यात आली होती,शासनाने ह्या साठी "खत्री आयोगाची" (khatri commision) नेमणूक केली होती.सध्याच्या विधानसभेत समाजाचे १५० सदस्य आहेत.त्यामुले "मराठा-कुणबी" किंवा "कुणबी-मराठा" अशी नोंद असनारयांचा समावेश ओबीसीत करण्याचा निर्णय शासनाने १ जून २००५ रोजी घेतला आहे.मराठा समाजाला ओबीसी घोषित करावे व आरक्षण मर्यादा ८०% पर्यंत वाढवावी. ही प्रमुख मागणी होती. शिवाय २३-१२-२००७ नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री विलासराव देशमुख(wilasrao deshmukh) ह्यानी संभाजी ब्रिगेड सोबत झालेल्या चर्चेनंतर ही मागणी मान्य करून सहा महिन्यांचा अवधी मागितला होता,ही मुदत संपल्यामुले हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे.थोडक्यात १९९१ ते २००८ ह्या सतरा वर्षाच्या कालावधीत सातत्याने ह्या मागणीसाठी पाठपुरावा केला आहे.आणि" ज्याना स्वतः ला ओबीसी म्हनन्यात कमीपणा वाटत असेल त्यानी तसे म्हनू नये",असा युक्तिवादही नारायण राणे(narayan rane) मुख्यमंत्री असताना करण्यात आला होता.डॉ पंजाबराव देशमुख(dr.punjabrao deshmukh) ह्यानिही १९५० ते १९५७ दरम्यान मराठा-कुनबी आरक्षणसाठी राज्यभर दौरा केला होता,म्हणुन ही मागणी आज-काल ची नसून फार जुनी आहे असे बऱ्याच जणांचे म्हनने आहे.
अधिक माहितीसाठी -
१) "आरक्षण वाढवा,देश घडवा"-पुरुषोत्तम खेडेकर
२) "मराठा समाज आणि आरक्षणाचा प्रश्न."-श्यामसुंदर मिरजकर
for more info ..read:-
aarkshan waadhwa ,desh ghadwa- by mr.purushottam khedekar.
Followers
OBC RESERVATION
"मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास...."
"मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास "मराठा विरुद्ध दलित' हा संघर्ष कमी होऊन नवनिर्मितीच्या दिशेने समाजाची वाटचाल सुरू होईल,'' असे मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे यांनी आज येथे सांगितले. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी लढा करून यश संपादन करायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सहकारनगर येथील शिंदे हायस्कूलच्या प्रांगणात उभारलेल्या शाहूनगरीत मराठा सेवा संघाच्या बाराव्या अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
कुणबी-मराठा एकच..
बरे झाले देवा "कुणबी" केलो नाहीतर दंभेची असतो मेलो - संत तुकाराम.
No comments:
Post a Comment